कुणाची लाज नाही! कसला पश्चाताप नाही!
लग्न-समारंभाच्या वेळी, जेव्हा पाहुणे किंवा वऱ्हाडी जेवण करत असायचे, तेव्हा भंगी दरवाजाच्या बाहेर मोठ-मोठ्या टोपल्या घेऊन बसून राहायचे. वऱ्हाड्यांच्या जेवणानंतर उष्ट्या पत्रावळी त्या टोपल्यात टाकल्या जायच्या. पुऱ्यांचे राहिलेले तुकडे, एखादा मिठाईचा तुकडा किंवा पत्रावळीवर उरलेल्या भाजीनं सर्वजण खूश व्हायचे. उष्टं चवीनं खाल्लं जायचं. ज्या वऱ्हाड्यांच्या पत्रावळीवरून कमी उष्टं मिळायचं, त्यांना ‘भुक्खड’ (भुकेल.......